भारताच्या औद्योगिक, सामाजिक विकासात रतन टाटांचे योगदान महत्वाचे – आ. सुधीर गाडगीळ

सांगली प्रतिनिधी :- पद्मविभूषण रतन टाटा यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या उपस्थितीत रतन टाटा यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की, “रतन टाटा यांचे निधन हे मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांची उणीव कायम भासेल. रतन टाटांनी टाटा सन्स चे अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर टाटा उद्योग समुहाचे चित्र बदलले. आधुनिक संगणक शास्त्रात भरीव वाढ करून टाटा कन्सल्टंन्सीला जागतिक स्तरावर पोहचवले. रतन टाटांची कामगिरी हि टाटाला आणि देशाला अभिमानास्पद आहे. ते भारतीय उद्योग क्षेत्रातील ‘टायटन’ होते. आपल्या अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योगातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी रतन टाटा ओळखले जातात. रतन टाटा एक यशस्वी उद्योजक तर होतेच त्याबरोबर कायम समाजाचा विचार करणारे, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना “यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, प्रकाश तात्या बिरजे, माजी नगरसेविका कल्पना कोळेकर, गीतांजली ढोपे-पाटील, अरुणा बाबर, प्रीती काळे, हेमलता मोरे, विश्वजीत पाटील, आनंदा चिकोडे, रवींद्र ढगे, गजानन नलवडे, गौस पठाण, अमर पडळकर, रणजीत सावंत इ. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.